ब्लॉग डिटेल

  • बायोचार नेमकं आहे तरी काय?

    बायोचार नेमकं आहे तरी काय?

    Posted on : 10 May 2025 By : Agri Search (India) Pvt. Ltd

    बायोचार नेमकं आहे तरी काय?

    बायोचार म्हणजे एक खास प्रकारचे कोळशासारखे पदार्थ, जे पीक अवशेष, लाकडाचे तुकडे किंवा शेण यासारख्या नैसर्गिक गोष्टींपासून तयार केले जाते. हे कमी ऑक्सिजनच्या वातावरणात हळूहळू जाळून तयार केले जाते – यालाच पायरोलीसिस म्हणतात. पण सामान्य कोळशासारखे इंधन म्हणून वापरण्याऐवजी, बायोचार जमिनीत टाकले जाते.

    शेतकऱ्यांनी याकडे का लक्ष द्यावे?

    बायोचार वापरण्याचे फायदे असे आहेत:

    अन्नद्रव्यं धरून ठेवते: बायोचारचे रचना सच्छिद्र (porous) असते, ज्यामुळे ते अन्नद्रव्यं साठवून ठेवते आणि पाण्याने वाहून जाण्यापासून वाचवते. त्यामुळे पिकांना दीर्घकाळ पोषण मिळते.

    पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते: कोरड्या भागात, बायोचार जमिनीत पाणी जास्त काळ टिकवून ठेवते. यामुळे पाणी कमी लागते आणि पिकं तजेलदार राहतात.

    जमिनीतील सूक्ष्मजीवांना मदत करते: बायोचार सूक्ष्मजीवांसाठी चांगले वातावरण निर्माण करते, जे नैसर्गिकरित्या पिकांच्या वाढीस मदत करतात.

    खते कमी लागतात: बायोचार जमिनीत आधीच असलेल्या अन्नद्रव्यांचा योग्य वापर करून खते वापरण्याची गरज कमी करते.

    जमिनीचे दीर्घकालीन आरोग्य सुधारते: एकदा बायोचार जमिनीत घातल्यावर, ते अनेक वर्ष टिकते आणि सतत जमिनीची रचना सुधारत राहते.

    वापरण्यापूर्वी एक छोटा सल्ला

     

    बायोचार थेट शेतात टाकण्याऐवजी, आधी त्यात कंपोस्ट, शेणखत किंवा कोणतेही नैसर्गिक खते मिसळा. यामुळे बायोचार अन्नद्रव्यांनी 'चार्ज' होते आणि सुरुवातीला अन्नद्रव्यांची कमतरता टळते.