ब्लॉग डिटेल

  •  पर्णरंध्रे (Stomata) – पिकांच्या श्वसनद्वारांचे महत्त्व आणि योग्य फवारणीचे शास्त्र

    पर्णरंध्रे (Stomata) – पिकांच्या श्वसनद्वारांचे महत्त्व आणि योग्य फवारणीचे शास्त्र

    Posted on : 17 Dec 2025 By : Agri Search (India) Pvt. Ltd

     पर्णरंध्रे (Stomata) – पिकांच्या श्वसनद्वारांचे महत्त्व आणि योग्य फवारणीचे शास्त्र

    पानांच्या पृष्ठभागावर असणारी अतिशय सूक्ष्म छिद्रे म्हणजे पर्णरंध्रे (Stomata). ही छिद्रे डोळ्यांना दिसत नसली, तरी पिकांच्या जीवनासाठी ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पिकांचे श्वसन, प्रकाशसंश्लेषण (अन्ननिर्मिती) आणि पाण्याचे नियमन या सर्व प्रक्रिया पर्णरंध्रांमधूनच घडतात. त्यामुळे पर्णरंध्रांचे कार्य समजून घेतल्यास शेती अधिक शास्त्रशुद्ध आणि फायदेशीर ठरते.

    पर्णरंध्रे म्हणजे काय?
    पर्णरंध्रे ही पानांवरील सूक्ष्म दारे आहेत. बहुतेक वेळा ती पानांच्या खालच्या बाजूला आढळतात. ही दारे उघड–बंद होऊन पिकांच्या गरजेनुसार वायू आणि पाण्याची देवाणघेवाण नियंत्रित करतात.

    पर्णरंध्रे उघडी असताना हवा आत–बाहेर जाते, कार्बन डायऑक्साइड (CO₂) पानात प्रवेश करतो, तर ऑक्सिजन (O₂) आणि पाण्याची वाफ बाहेर पडते.

    पर्णरंध्रे सतत उघडी का नसतात?
    हवामान, तापमान, आर्द्रता आणि पिकांवरील ताण यानुसार पर्णरंध्रे उघड–बंद होत राहतात. जास्त उष्णता किंवा पाणीटंचाईच्या स्थितीत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पर्णरंध्रे बंद होतात.

    पर्णरंध्रे कधी जास्त उघडी असतात?
    सकाळी ६.०० ते ९.००
    संध्याकाळी ४.३० ते ६.३०
    तापमान मध्यम आणि आर्द्रता योग्य असताना

    पर्णरंध्रे कधी बंद होतात?
    दुपारी तीव्र उन्हात
    तापमान जास्त आणि हवा कोरडी असताना
    पिकांवर पाणीटंचाई किंवा उष्णतेचा ताण असताना

    फवारणीसाठी योग्य वेळ कोणती?
    खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, बायोस्टिम्युलंट्स किंवा कीटकनाशके प्रभावीपणे काम करण्यासाठी ती पर्णरंध्रांमधून आत शोषली जाणे आवश्यक आहे.

    सर्वोत्तम वेळ –
    सकाळी ६ ते ९
    संध्याकाळी ४.३० नंतर

    या वेळेत फवारणीचे थेंब पानांवर टिकतात आणि शोषण जास्त होते.

    फवारणीसाठी टाळावी अशी वेळ
    दुपारी ११ ते ४ – या वेळेत पर्णरंध्रे बंद असल्यामुळे फवारणीचा खर्च वाया जातो.

     

    निष्कर्ष
    योग्य वेळेची फवारणी म्हणजे अधिक परिणाम, कमी खर्च आणि निरोगी पिके. पर्णरंध्रांचे विज्ञान समजून घेतले तर शेती अधिक फायदेशीर होते.